शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
4
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
5
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
6
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
7
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
8
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
9
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
10
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
11
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
12
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
13
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
14
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
15
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
16
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
17
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
18
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
19
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
20
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले

शेतकरी, वीट व्यावसायिकांना बारा कोटीचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:47 IST

उदगाव : शिरोळ तालुक्यातील उदगाव-चिंचवाड कृष्णा नदीकाठावरील असलेल्या मातीचे बेकायदेशीरपणे उत्खनन करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी

ठळक मुद्देउदगाव, चिंचवाड अवैध माती उत्खनन प्रकरण : शेतकºयांना प्रशासनाचे आदेश जारी

उदगाव : शिरोळ तालुक्यातील उदगाव-चिंचवाड कृष्णा नदीकाठावरील असलेल्या मातीचे बेकायदेशीरपणे उत्खनन करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी शेतकरी व वीट व्यावसायिकांना सुमारे बारा कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे शिरोळ तालुक्यात नव्हे, तर कोल्हापूर जिल्ह्याच्या वीटभट्टी व्यावसायिकांत खळखळ उडाली आहे. उदगावमध्ये १० कोटी ४१ लाख १८ हजार, तर चिंचवाडमध्ये २ कोटी १६ लाख ९ हजार इतका दंड वसूल करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

उदगाव-चिंचवाड येथील माती उत्खननाबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे शरद चव्हाण यांनी तक्रार दाखल केली होती. यावर जिल्हाधिकारी यांनी प्रांताधिकारी व तहसीलदार यांना उदगाव-चिंचवाड येथील उत्खनन करण्यात आलेल्या मातीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. यामध्ये एकूण ३३ हजार ४८७ ब्रॉस मातीचे बेकायदेशीर उत्खनन करण्यात आल्याचे समोर आले होते.

हा अहवाल मुंबई लोकायुक्त यांच्याकडे सादर केल्यानंतर त्यांनी तत्काळ दंड वसूल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार उदगाव-चिंचवाडमधील बेकायदेशीरपणे माती उत्खनन केलेल्या शेतकºयांना प्रशासनाकडून दंड वसूल करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार अनधिकृत उत्खनन केलेल्या मातीच्या बाजारभावाप्रमाणे तिप्पट रक्कम दंड भरण्याचे आदेश दिले आहेत.पंधरा दिवसांच्या आत दंडात्मक रक्कम न भरल्यास जमीन महसुलाची थकबाकी म्हणून सक्तीच्या उपायाने वसूल करण्यात येणार आहे, असे आदेश माती उत्खननदारांना लागू करण्यात आले आहेत.

ही रक्कम मुदतीत वसूल न झाल्यास उदगाव व चिंचवाडच्या तलाठ्यांनी उत्खननदार व्यक्तीच्या सात-बारा पत्रकी नोंद करून याचा अहवाल वरिष्ठ विभागाकडे पाठविण्याचे आदेश तहसीलदार गजाजन गुरव यांनी काढला आहे. गेल्या दहा वर्षांपासून उदगाव-चिंचवाड परिसरात कृष्णा नदीकाठावर मोठ्या प्रमाणात माती उत्खनन करून वीट व्यवसाय थाटला आहे. स्थानिक प्रशासनाला हाताशी धरून कमी मातीची रॉयटी भरून मोठ्या प्रमाणात मातीचे बेकायदेशीर उत्खनन करण्यात आले आहे. याबाबत चिंचवाड येथील शरद चव्हाण यांच्यासह नागरिकांनी आवाज उठवून वीट व्यावसायिकांच्या विरोधात मोट बांधली होती. त्याला चांगले यश मिळाले आहे. मात्र, वीट व्यावसायिकांनी केलेले माती उत्खनन आता शेतकºयांच्या मानगुटीवर बसले आहे.'लोकमत'चा प्रभावउदगाव-चिंचवाड परिसरात बेकायदेशीरपणे माती उत्खनन होत असताना नागरिकांनी हा मुद्दा उचलून धरला होता. त्यामुळे ‘लोकमत’ने सातत्याने उदगाव-चिंचवाड परिसरातील होत असलेल्या माती उत्खननाबाबत प्रत्येक मुद्द्यावर आवाज उठवला होता. त्यामुळे आता माती उत्खननदारांना साडेबारा कोटींचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे परिसरात निसर्गाचे संवर्धन करून नागरिकांचे प्रश्न मांडल्याबद्दल ‘लोकमत’चे कौतुक होत आहे.

टॅग्स :collectorतहसीलदारriverनदी